ताज्या घडामोडी
शहरात काही लोकांच्या खाजगी वादात महापुरुषांचे नाव घेऊन राकारण सुरु आहे, मनमाड नगरपरिषद ने गोरगरिबांच्या पोटापाण्यावर लाथ मारू नये अन्यथा नाईलाजाने आम्हाला मोठा आंदोलन उभारावे लागेल,टपरी धारक संघटना तर्फे नगरपरिषदला आंदोलनाचा ईशारा,
मनमाड :- मनमाड शहरात सद्या काही लोकांच्या खाजगी वादात महापुरुषांचे नावाचा वापर करून एकमेकांना नुकसान पोहचवण्याचे गलीच्छ
राकारण सुरु आहे, त्यात मनमाड नगरपरिषद ने देखील कुठलाही शहानिशा व विचार न करता थेट 40 ते 50 गोरगरीब टपरीधारकांना नोटीसे दिली आहे,
सदर नोटीसात गोरगरीब टपरीधारकांवर तीन दिवसात कारवाई करण्याचा ईशारा मनमाड नगरपरिषदने दिलेला आहे,
या हुकूमशाही व सूड बुद्दीची कारवाई व नोटिसा विरुद्ध टपरी धारक संघटनाने निवेदन देऊन आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
टपरी धारक संघटनाने निवेदन द्वारे मनमाड नगर परिषद विरोधात मोठं आंदोलन उभारण्याचे ईशारा दिलेला आहे,
टपरी धारक संघटना ने मनमाड नगरपरिषदला दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,
पाकीजा कॉर्नर अण्णाभाऊ साठे स्मारक जवळ आमचे, मनमाड नगर परिषद तर्फे ठराव करून जागा भाडेतत्वा वर घेऊन तसेच मनमाड नगरपरिषदचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन, 30 ते 40 वर्षापासून लोखंडी टपरी हातगाळे वगैरे ठेवून आमचे व्यवसाय उदरनिर्वाह सुरू आहे.
आम्ही नगरपरिषदेचा डेली कर पावती देखील अदा करतो, त्या मुळे नगरपरिषद च्या उत्पन्नात नक्कीच वाढ होत आहे.
आमच्या दुकानांमुळे अण्णाभाऊ साठे स्मारकाला कोणतेही नुकसान नाही. म्हणून स्वतः अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यांची आज पर्यंत कुठलीही तक्रार नाही,तसेच आमच्या टपऱ्यामुळे शहरातील रहदारीस कुठलीही प्रकारची अडचण होत नाही, परंतु मनमाड शहरातील काही लोकांच्या खाजगी वादात जाणूनबुजून गोरगरीब लोकांना टार्गेट करून त्यांचे उदरनिर्वाह साधने त्यांचे दुकानें उध्वस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहे.
स्वतः अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यांची कुठलीही प्रकारची तक्रार नसतांना, फक्त खाजगी खुन्नस काढण्याच्या राजकीय हेतूने शहरातील एका दिशेला राहणारे लोक हे शहरातील दुसऱ्या दिशेचे अतिक्रमण काढा म्हणून बळजबरीचे राजकारण करून आंदोलन करीत आहे, हे सर्व आपसातील वाद विवादामुळे आणि तु मोठा की, मी मोठा हे सिद्ध करून स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी शहरात गलीच्छ राजकारणाचे प्रकार सुरु आहे.शहरात यांच्या आपसातील वाद विवादात मात्र महापुरुषांच्या नावाचे वापर करून गोरगरिबांच्या पोटापाण्यावर लाथ मारण्याचे प्रयत्न केले जात आहे, मोठी शोकांतिका आहे,
त्यात मनमाड नगर परिषदने देखील कुठलीही प्रकारची शहानिशा व विचार न करता थेट 40 ते 50 गोरगरिबांना कारवाईची नोटीसे दिली हे कितपत योग्य आहे.?
एक तर नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित झालेले असून, तालुक्यातील व्यवसाय हे मंद झालेले आहे परिणामी मनमाड शहरातील नागरिकांना आपले पोट पाणी भरण्यासाठी नाशिक व इतर ठिकाणी बाहेर गावी जावे लागत होते, परंतु तालुक्याचे कुटुंब प्रमुख मा,आमदार सुहास अण्णा कांदे साहेब, यांनी स्वतः आपल्या तर्फे रोजगार मेळावे आयोजित करून,शहरातील युवकांना रोजगाराची संधी हाताला काम उपलब्ध करून दिले आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यात या भयानक मंदीच्या काळात तसेच पावसाळा मुळे शहरातील धंदे पाणी हे मंद असतांना अश्या परस्थितीत गोर-गरीब टपरीधारक हे दिवसभर परीश्रम करून आपले व आपल्या परिवाराचे कसे तरी उदरनिर्वाह करण्याचे प्रयत्न करत आहे,
परंतु शहरातील काही लोकांच्या खाजगी वादात महापुरुषांचे नावाने राकारण करून एकमेकांना नुकसान पोहचविण्याच्या राजकीय हेतूने थेट गोरगरीब टपरीधारकांवरच अन्याय केलं जातं आहे,
मनमाड नगर परिषद हे गोरगरिबांवर अतिक्रमणाची कारवाई करण्याच्या तयारीत आहे, दिसत आहे,
जर मनमाड नगर परिषद तर्फे गोरगरीब लोकांच्या टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली तर या गोरगरीब टपरीधारकांचे पोट भरण्याचे साधन त्यांचे उदरनिर्वाह हे पूर्ण उध्वस्त होणार आहे. व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही.40 ते 50 लोकांचे व त्यांच्या परिवाराचे उप जीविका चे साधन त्यांचे उदरनिर्वाह उध्वस्त होईल अशी मनमाड नगरपरिषदने कुठलीही कारवाई करू नये अन्यथा वेळ पडली तर मनमाड नगरपरिषद च्या सूडबुद्दी च्या हुकूमशाही कारवाईच्या विरुद्ध आम्ही 40 ते 50 टपरीधारक पोटापाण्यासाठी सामुदायिक आत्मदहन करू याला जबाबदार कुठलेही विचार न करता आम्हाला नोटीस देणारे मनमाड नगरपरिषद प्रशासन व मुख्यधिकारी साहेब जवाबदार राहतील तसेच शहरातील आपली खाजगी खुन्नस काढण्यासाठी महापुरुषांचे नावाने राजकारण करणारे ते लोक देखील जबाबदार राहतील,