मनमाड:आशिया खंडातील नंबर दोन चे असणारे धान्य साठवणूक गोडाऊन असलेल्या भारतीय खाद्य निगम या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे येथील सुरक्षा धोक्यात आली आहे भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊन क्रमांक 30 मधून पहाटेच्या सुमारास अज्ञात चोट्याने या गोडाऊन चे नटखोलून यामध्ये असलेले चार पितळी घंटे व बारा कपिंग हाऊस पाईप असा पंधरा हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याने यासंदर्भात मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी भारतीय खाद्य निगम मधून मोठ्या प्रमाणात धान्य असलेल्या पोत्यांची तसेच चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याचे प्रकार घडले असताना सुद्धा आता गोडाऊन मधूनच पितळी घंटे चोरी झाल्याने या ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोरांचे धाडस हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे या भारतीय खाद्य निगम मध्ये कडे कोट सुरक्षा व्यवस्था असताना वारंवार चोरीच्या घटना या ठिकाणी होणे ही चिंतेची बाबा असून फक्त आम्ही कोणालाही आत प्रवेश देत नाही असे म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.